Search This Blog

Tuesday 13 December 2011

सुखा मागे धावता धावता ...............!!!!!

सुखा मागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान.
स्वप्न सत्यात आनता आनता दमछाक होते खुप ,
वाटी वाटीन ओतले तरी कमीच पडत तुप .

बायका आणि पोरंसाठी चाले म्हणे हा खेळ,
पैसा आणून ओतेन पण मागु नका वेळ.
करियर होत जीवन मात्र जगायच तंत्र ,
बापाची ओळख मुले सांगती पैसा छापयाच यंत्र.


चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुना स्वताहच्याच घरी ,
दोन दिवस कौतुक होत नंतर डोकेदुखी सारी.
मुलच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो त्याना सवयच नसते मुळी.

क्षणिक औदासीन्य येत ,मात्र पुन्हा सुरु होत चक्र ,
करियर करियर दलन दलता स्वास्थ्य होते वक्र .
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या .

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागत काही
घालान्याच्या हट्टापाई श्वासाच मुळी घेतला नाही .
सगळ कही पाहता पाहता आरशात पाहन राहून गेल ,
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेल .

कवी : गणेश कदम

मनातले रुप माझे..............!!!!!!

मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना


कवी : गणेश कदम.

अस्थाला जाणारा सूर्य.......!!!

अस्थाला जाणारा सूर्य
निसर्गाची होणारी घुसमट,
आज एक संकेत देत आहे .....
रात्र हि वैर्याची आहे...............

गावाबाहेरची पडकी विहीर
नरसोबाच्या नावाचा उतारा,
अमावस्ये चा चंद्र साक्षीला आहे ......
रात्र हि वैर्याची आहे...............

वेशी कडचे चिंचेचे झाड
रात्री अपरात्री टीवटीवनारी टिटवी,
जंगली कुत्र्याचं आकसून रडण सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............


मैलो अंतराची पाऊल वाट
रस्त्यात लागलेली मसणवाट ,
चिता जाळण्यात मग्न आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

दूर कुठे ओसाड रान
पिकलेल ते उसाचे शेत ,
आज कोल्हयांची गर्दी वाढतच आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

खळ खळ वाहणारा ओढा
अवती भवती पसरलेली शांतता ,
आज ओरडून ओरडून सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

पडलेल्या घराच्या भिंती
हवेने वाजलेली कडी ,
कोणीतरी असल्याचा भास होत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

मध्यान रात्रीची वेळ
तीच श्वासांची कुजबुज
अजूनही रात्र सरायला वेळ आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

अंधाराच्या चादरीला पडलेलं चिद्र
एक सूर्य कवडसा आत आला आहे
ह्या पाहते नंतर ती रात्र..... पुन्हा येणार आहे
रात्र हि वैर्याची आहे...............रात्र हि वैर्याची आहे..

कवी : गणेश कदम