Search This Blog

Saturday 23 July 2011

एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.


एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.

तर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो "च्या..याला नेम चुकला.."

तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की " बेटा असा नाही बोलायचा , हे
अप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे ".

त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो
"च्या..याला नेम चुकला.." ..

हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो...

तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो
"च्या..याला नेम चुकला.."

आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..
"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."

साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज
येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...

त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ...

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले....


एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी....................